HW News Marathi
देश / विदेश

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

दसऱ्यापासून शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राचे चांदणे हे गुणकारी आणि औषधी असते, असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, ‘लंकाधिपती रावण हा शरद पौर्णिमेच्या रात्री आरश्याच्या माध्यमातून चंद्राचे चांदणे नाभीमध्ये ग्रहण करायचा, असे केल्यानेच रावणाला शक्ती प्राप्त होत होती. ‘शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा आश्विन पौर्णिमासुद्धा म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री खीर किंवा मसाला दूध बनले जाते. खुल्या निरभ्र आकाशखाली ते ठेवले जाते. यामागे अशी दंतकथा आहे की चंद्राच्या चांदण्यातून अमृत त्या खिरीत किंवा मसाला दुधामध्ये येते. परंतु या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे दुधामध्ये लैक्टिक ऍसिड आणि अमृत घटक आहे. हा घटक चंद्राच्या किरणांना मोठ्या प्रमाणात शोषून घेतो. त्याच कारणामुळे ऋषीमुनींनी खीर रात्री मोकळ्या आकाशाच्या खाली ठेवण्यास सुरुवात केली. ही परंपरा विज्ञानावर आधारित आहे.

शरद पौर्णिमेचे अनेक फायदे आहेत. शरद पौर्णिमेच्या रात्री प्रत्येकाने ३० मिनिटे तरी चंद्राच्या चांदण्यात उभे राहावे, असे म्हटले जाते. शरद पौर्णिमेची रात्र ही दम्याचा आजार असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी असते, असे म्हटले जाते. ज्यांची दृष्टी कमी असेल तर त्यांनी दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत रात्री १० ते १५ मिनिटे चंद्राकडे पाहावे, असा सल्लाही देण्यात येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनातील कटुतेला तिलांजली देण्याचा आजचा दिवस !

News Desk

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त उर्मिला मातोंडकर सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

महाराष्ट्रात आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

News Desk