HW News Marathi
देश / विदेश

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

दसऱ्यापासून शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राचे चांदणे हे गुणकारी आणि औषधी असते, असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, ‘लंकाधिपती रावण हा शरद पौर्णिमेच्या रात्री आरश्याच्या माध्यमातून चंद्राचे चांदणे नाभीमध्ये ग्रहण करायचा, असे केल्यानेच रावणाला शक्ती प्राप्त होत होती. ‘शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा आश्विन पौर्णिमासुद्धा म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री खीर किंवा मसाला दूध बनले जाते. खुल्या निरभ्र आकाशखाली ते ठेवले जाते. यामागे अशी दंतकथा आहे की चंद्राच्या चांदण्यातून अमृत त्या खिरीत किंवा मसाला दुधामध्ये येते. परंतु या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे दुधामध्ये लैक्टिक ऍसिड आणि अमृत घटक आहे. हा घटक चंद्राच्या किरणांना मोठ्या प्रमाणात शोषून घेतो. त्याच कारणामुळे ऋषीमुनींनी खीर रात्री मोकळ्या आकाशाच्या खाली ठेवण्यास सुरुवात केली. ही परंपरा विज्ञानावर आधारित आहे.

शरद पौर्णिमेचे अनेक फायदे आहेत. शरद पौर्णिमेच्या रात्री प्रत्येकाने ३० मिनिटे तरी चंद्राच्या चांदण्यात उभे राहावे, असे म्हटले जाते. शरद पौर्णिमेची रात्र ही दम्याचा आजार असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी असते, असे म्हटले जाते. ज्यांची दृष्टी कमी असेल तर त्यांनी दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत रात्री १० ते १५ मिनिटे चंद्राकडे पाहावे, असा सल्लाही देण्यात येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्णब गोस्वामींच्या ‘त्या’ वर्तणुकीनंतर मला शरद पवारांनी फोन केला अन्…!

News Desk

रवीकुमार दहिया रौप्यपदकाचा मानकरी!

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk
राजकारण

अटलबिहारी यांच्या भाचीला राजनांदगांव मतदारसंघातून उमेदवारी

swarit

रायपूर । छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. रमण सिंह हे राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा त्यांच्यासमोर करुणा शुक्ला यांचे आव्हान असेल.

करुणा शुक्ला १९९३ मध्ये पहिल्यांदा भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या ४-५ वर्षांपासून छत्तीसगडच्या भाजपच्या नेतृत्त्व आणि रमण सिंह सातत्याने यांच्यावर टीका होत आहे. २०१४ मध्ये करुणा शुक्ला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने करुणा यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.

काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील १८ जागांपैकी १२ जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. यानंतर ६ उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काळ (२२ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. ११ डिसेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

Related posts

यंदा बारामतीत भाजपचे कमळ फुलवू, मुख्यमंत्र्यांचा दावा

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र, जीवे मारण्याची दिली धमकी

News Desk

भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… !

News Desk