HW News Marathi
राजकारण

अटलबिहारी यांच्या भाचीला राजनांदगांव मतदारसंघातून उमेदवारी

रायपूर । छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. रमण सिंह हे राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा त्यांच्यासमोर करुणा शुक्ला यांचे आव्हान असेल.

करुणा शुक्ला १९९३ मध्ये पहिल्यांदा भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या ४-५ वर्षांपासून छत्तीसगडच्या भाजपच्या नेतृत्त्व आणि रमण सिंह सातत्याने यांच्यावर टीका होत आहे. २०१४ मध्ये करुणा शुक्ला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने करुणा यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.

काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील १८ जागांपैकी १२ जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. यानंतर ६ उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काळ (२२ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. ११ डिसेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna
महाराष्ट्र

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

पुणे | राम मंदिरासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले आहे. त्यासाठी भागवतांनी दगडूशेठ गणपतीला विधीवत अभिषेक देखील केला आहे. अभिषेकादरम्यान भटजींनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रही म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे. नागपूरमध्ये विजयादशमीला झालेल्या कार्यक्रमात राम मंदिर लवकरात लवकर बांधा असे म्हटले होते. त्यावर आज त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडेही घातले आहे. पण सध्या अयोद्धा राम मंदिर मुद्द्यावर श्रेयवादासाठी राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे.

Related posts

“भय इथले संपत नाही”, चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा

News Desk

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मिळाले मैदान

News Desk

विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी! – नाना पटोले

Aprna