HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

श्रीनगर | पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांचे लक्ष जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा रेषेवर कारवाया सुरूच आहेत. पाकच्या या कारवाईला भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाच्या १०० तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे १० हजार जवान येथे तैनात करण्यात येणार स्पष्टीकरण जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहे. मलिक यांनी आज (२४ फेब्रुवारी) झालेल्या राज्याच्या प्रशासकीय बैठकी वेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, सैन्य ही लोकसभा निवडणुकांसाठीच वाढवली आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने एलपीजी स्टॉक संपला आहे. त्यामुळे जम्मूहून श्रीनगरला पुरवठा होत नाही. सरकार काश्मीरपर्यंत साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही राज्यपाल म्हणाले. तसेच सीमारेषेपासून जवळ असलेल्या गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतु गावकरी हे आपले गाव सोडून जाण्यास तयार नसल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर होणार

News Desk

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा केल्यास पाच वर्षांची शिक्षा

News Desk

‘निर्भया’प्रकरणी चारही आरोपींना फाशीच – सर्वोच्च न्यायालय

News Desk