HW News Marathi
देश / विदेश

मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे

नवी दिल्ली । मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु या याचिकेमागे कोणताही योग्य हेतू नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. १८ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार आहे, लष्करात भरती होण्याचा अधिकार आहे, तर २१ वर्षापर्यंत लग्नासाठी थांबण्यात काहीच मुद्दा नाही, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.

ही याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सर न्यायधीश रंजन गोगोई, जस्टीस एस.के.कौल व जस्टीस एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. ५० वर्षे वय असलेल्या याचिकाकर्त्याने लग्नाचे वय १८ करण्याची मागणी करू नये, असे मत कोर्टाने नोंदवले आहे. तसेच १८वर्षाचा मुलगा स्वतःहून येईल, तेव्हा या मागणीचा विचार करू असे ही कोर्टाने सांगितले. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘अमरावतीतल्या हवाई सुंदरी श्वेता शंकेची धाडसी कामगिरी’, सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!

Ruchita Chowdhary

चंद्रापासून २.१ किलोमीटरवर ‘विक्रम’शी संपर्क तुटला

News Desk

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू

Aprna
मुंबई

ओला-उबेर चालक असंख्य मागण्यासाठी रस्त्यावर, बेमुदत बंदचा इशारा

swarit

मुंबई | महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघा तर्फे आज ओला-उबेर कंपनी करत असलेल्या, मनमानी कारभारा विरोधात कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी २५० ते ३०० ओला उबेर चालक-मालक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकार विरोधात आणि ओला उबेर कंपनी विरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त ओला उबेर चालक यांनी सहभाग घ्यावा असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव माहिते यांनी चालकांना सांगितले. तसेच जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत कोणीही रस्त्यावर ओला उबेर चालवणार नाही. असा निर्णय देखील घेण्यात आला. कंपनीने दिलेल्या आश्वासनाना आणि हमी ना कंपनी प्रामाणिक राहिली नाही. त्यामुळे ओला उबेर चालक व मालक यांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यांनी घर कसं चालवाव ? हा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे कंपनीच्या मनमानीला कंटाळून हे आंदोलन बेमुदत व मंत्रालयाच पर्यंत नेण्यात येईल असा ईशारा देखील ओला उबेर चालकांनी दिला आहे.

काही कंपनी मागण्या आहेत त्या मान्य कराव्या त्यांनंतरच आम्ही गाड्या रस्त्याला लावू असे या आंदोलनात सांगण्यात आले. कंपनीच्या व बँकांच्या त्रासाला कंटाळून मागच्या काही दिवसात एका उबेर चालकाने आत्महत्या केली. कंपनी आमच्यावरही ही वेळ आणेल अस दिसतंय त्यामुळे आम्ही आमचा मागण्यासाठी हे आंदोलन करत आहोत असं एका चालकाने सांगितले.

काय आहेत नेमक्या मागण्याखालीलप्रमाणे

  • पेट्रोल /डिझेल/सीएनजी वाढत्या किमती नुसार भाड्या मध्ये चाड उतार व्हावे.
  • बेस रेट गो सेगमेंट १०० प्रति की मी १८ रुपये लावावा.
  • बेस रेट सिडन १०० प्रति की मी २०
  • बेस रेट एस यु व्ही १५० प्रति की मी २३
  • न्यु कॅब अटेचमेन्ट बंद करावे
  • पार्टनर कॅब आणि लीज कॅब याना एकसारखे बिसनेस द्यावे
  • गॅरेजला गेलेली लीज कॅब दैनिक माफ व्हावी
  • लीज कॅब चा ममेंटनान्स पूर्णपणे कंपनीने द्यावा
  • कस्टमर कॉम्प्लेइंट एकतर्फी ऐकून ब्लॅक लिस्ट करणे बंद करावे.
  • कस्टमर चा व्हेरिफिकेशन झालेल्या नंबर वरूनच गाडी बुकींग व्हावी.

Related posts

लोकलचे दरवाजे बंद केल्य‍ास कारवाई होणार

News Desk

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk

ठाण्यातील चराई येथील शिव आनंद उद्योग संकुलात आग

News Desk