HW News Marathi
देश / विदेश

नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार कत्तूथारा यांचा संशयास्पद मृत्यू

केरळ | केरळ नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार कॅथलिक पादरी कुरिआकोसे कत्तूथारा (६१) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. केरळमधील ननवर १३ वेळा बलात्कार करणाऱ्या आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्कालविरोधात कत्तूथारा यांनी साक्ष दिली होती. कत्तूथारा हे जालंधरमधील सेंट मेरी चर्चमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. कत्तूथारा यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली आहे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

पादरी कुरिआकोसे कत्तूथारा यांच्या संशायास्पद मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. कत्तूथारा यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या, अशी माहिती मिळते. त्यांच्या मृत्यूमागे आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्काल यांचा कट असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्कालविरोधात साक्ष दिल्याने कत्तूथारा यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, जालंधर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार

News Desk

केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे | पंतप्रधान मोदी

News Desk

‘राणेंनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी’, संजय राऊतांची इच्छा

Jui Jadhav
राजकारण

भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज फलंदाज निवडणुकीच्या पिचवर

swarit

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्र, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे तिघेही दिग्गज फलंदाज आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सेहवाग आणि गंभीर यांनी भाजप सरकारच्या समथनार्थ ट्विटने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहेत. परंतु, धोनीचे नाव या यादीत आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कारण धोनी आजही क्रिकेटमध्ये यशस्वी इनिंग्ज सुरू आहे. त्यामुळे धोनी राजकारणाच्या पिचवर कशासा काय उतरेल?, असा प्रश्न करत धोनीच्या चहात्यांकडून केला जात आहे.

पुढच्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इग्लंडमध्ये होणार असून यात धोनीने विश्वचषक खेळण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे. धोनीकडे सध्या संघाचे कर्णधारपद नसले, तरी तोच पडद्यामागचा सूत्रधार असल्याचे क्रिकेटज्ञांनी म्हटले आहे. हे विराट कोहली देखील मान्य करतो. कोहलीवर जेव्हा दडपण येते तेव्हा कॅप्टन कूल धोनीच त्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे फक्त धोनीलाच हा विश्वचषक खेळायचा नाही, तर संघ व्यवस्थापनालाही धोनी संघात हवा आहे. मग तो अचानक निवडणुकीच्या मैदानात कशाला उतरणे असा सवाल उपस्थित राहत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी या चर्चांना उधाण आले होते. परंतु, ती निव्वळ सदिच्छा भेट होती, त्याचा अर्थ २०१९च्या निवडणुकीशी जोडणे योग्य नाही, असे राजकीय जाणकारांनाही वाटले होते

गौतम गंभीरकडे मीनाक्षी लेखी यांच्याजागी दिल्लीच्या राजेंद्रनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली आहे. “मीनाक्षी लेखींच्या कामावर मतदारसंघातील जनता फार खुश नाहीत. त्यामुळे पक्षाने या मतदारसंघात गंभीरचा विचार करुन असा निर्णय घेतला आहे.

Related posts

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची तीव्र नाराजी

News Desk

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna

शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे

News Desk