HW News Marathi
देश / विदेश

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

नवी दिल्लीः हिंदूत्वाच्या चेहरा घेऊन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला आता राम मंदिराचा विसर पडल्याचे दिसत आहे. भाजप सरकार कधीच राम मंदिर उभारणार नसल्याचे केंद्रीतील राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही (भाजपने) राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार राम मंदिराची निर्मिती करू शकत नाही,’ असे शुक्ला यांनी म्हटले. न्यायालयाच्या निकालानंतर किंवा आपापसात एकमत झाल्यावरच राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राम भक्तांसाठी मोदी सरकार बनवणार मुव्हिंग ब्रीज, पहा व्हिडीओ

News Desk

‘खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, सेनेने पाकिस्तानला सुनावले!

News Desk

त्रिपुरामध्ये सत्ता येताच भाजपचा उपद्रव सुरू

News Desk
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

दोन कोटी 90 लाख जुन्या नोटांसह तीघांना अटक

News Desk

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk

राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते – रोहित पवार

News Desk