HW News Marathi
देश / विदेश

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर मोदींनी विद्यार्थ्यांसमोर भाष्य करावे, राहुल गांधींचे आव्हान

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलीस सुरक्षा न घेता देशातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद साधून दाखववा. आणि मोदींनी देशातील ढासळती अर्थव्यवस्थेवर भाष्य करावे,” असे खुले आव्हान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी दिले आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ढासळत जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. हे मोदींनी विद्यार्थ्यांसमोर जावून सांगायला हवे. मात्र, मोदींमध्ये विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोलण्याची हिंमतच नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली.

दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, “तरूणांनी उठवलेला आवाज योग्य आहे. तो दडपता कामा नये. सरकारने तरुणांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. तरुणांचा आवाज दडप नये, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज (१३ जानेवारी) विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएए) या विरोधात झालेले आंदोलन आणि अनेक विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

Manasi Devkar

भारतात घुसलेल्या पाकिस्तानी हद्दीतील कार्गो विमानाला जयपूर विमानतळावर उतरविले

News Desk

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबणार

News Desk