HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला आणि कार सील

रायगड | नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील किहीम समुद्र किनाऱ्याजवळ ७० गुंठे जागेमध्ये असलेला आलिशान बंगला आहे. या बंगल्यावर मुंबई सीबीआय पथकाने मंगळवारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईनंतर मोदीचा बंगल्यासोबत त्यांच्या दोन कार देखील सील केल्याची माहिती मिळत आहे. सील केलेल्या बंगल्याची किंमत सुमारे ४ कोटी असल्याचे सांगितले जाते.

पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा कोटींचा चूना लावून परदेशात फरार झाला आहे. बँकेने ही माहिती सीबीआय आणि ईडीला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि गुजरात येथील मोदींच्या शोरुमवर छापे मारण्यात आले. दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इट्स हाऊस येथील बुटीक आणि लोअर परळ येथील पेनिंसुला बिझनेस पार्कमधील वर्कशॉपवरही ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात, निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk

दिल्लीत उद्या शरद पवारांनी बोलावली बैठक,१५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार

News Desk

‘भारतात सर्व छान चालले आहे,’ ‘हाऊडी मोदी’ला पंतप्रधान मोदींचे उत्तर

News Desk
महाराष्ट्र

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

swarit

सांगली – तीनतलाक विधेयकाला मुस्लिम महिलांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात आली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड ‘तीन तलाक वापिस लो….वापिस लो’, ‘इस्लामी शरित हमारा एजाज’ अशा घोषणा देत

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डने मोर्चा काढला असून या मोर्चेत मोढ्या प्रमाणत महिला सहभाग झाले होते.

‘इस्लामी शरितमध्ये कोणी हस्तक्षेप करुन नये. नेते मंडळी हे फक्त लोकांची मते मिळवण्यासाठी तीन तलाक विरोधात कायदा बनवण्यात येत आहे. आम्हाला तीन तलाकला विरोध नाही’ असे मत या मोर्चातील महिलांनी व्यक्त केले आहे. मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी सरकार हा कायदा करत आहे.

काही महिला तीन तलाक कायदा व्हावा म्हणून मगणी करतायेत तर काही मुस्लिम संघटना याला विरोध करत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला सरकाराने कायदा करुन नये म्हणून ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे गेली अनेक वर्षापासून तीन तलाकवर कायदा बनवण्याची मोठी मागणी होत होती. केंद्र सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला असून राज्यसभेत मांडण्यात आले होते. पण या कायद्यात काही त्रुटी असल्याने ते त्रुटी दुरूस्त करून पुन्हा सभेत मांडण्यात येणार आहे.

Related posts

विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार !

News Desk

शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल !

News Desk

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk