HW News Marathi
देश / विदेश

Hyundai कंपनीच्या ‘त्या’ ट्वीटवरून वाद; कंपनीनं बिनशर्त माफी मागावी, शिवसेनेची मागणी

मुंबई | ह्युंदाई ही कार तयार करणारी कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीने केलेल्या ट्वीटर पोस्टनंतर कंपनीला बरंच ट्रोल केलं जात आहे. ह्युंदाई पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर #BoycottHyundai ट्रेंड होत आहे. तर हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून ह्युंदाई इंडियाकडून अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलं आहे. मात्र, तरी देखील भारतीय ग्राहकांचा संताप कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे. यामुळेच ट्विटरवर बॉयकॉट ह्युंदाई हे सतत ट्रेंड होत आहे.

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानी हुंडाईच्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल भारतीयांचा संताप कायम आहे. या मुद्यावर ह्युंदाई इंडियाने स्पष्टीकरण जारी केले आहे. भारतीय राष्ट्रवादाचा आदर करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने दक्षिण कोरियानंतर भारताला दुसरे घर म्हणूनही वर्णन केले आहे. मात्र, या भारतविरोधी ट्विटवरून वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने आपल्या वक्तव्यात कुठेही पाकिस्तानच्या या ट्विटचा उल्लेख केलेला नाही किंवा खेदही व्यक्त केलेला नाही. त्यामुळे आता याबाबत भारतात पुन्हा एकदा कंपनीवर टीका होत आहे. याशिवाय ट्विटरवर बॉयकॉट ह्युंदाई असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

काय होतं व्हायरल पोस्टमध्ये ?

५ फेब्रुवारी रोजी ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेच्या बाजूने लिहिण्यात आले आहे. त्यानंतर ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. ह्युंदाई पाकिस्तानच्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “चला काश्मिरी बांधवांच्या बलिदानाची आठवण करूया आणि त्यांना पाठिंबा देऊया जेणेकरून ते स्वातंत्र्यासाठी लढत राहतील.” तसेच या पोस्टमध्ये ह्युंदाई पाकिस्तान आणि Kashmir Solidarity Day असे हॅशटॅग देखील देण्यात आले आहेत.

कंपनीनं बिनशर्त माफी मागावी – प्रियंका चतुर्वेदी

दरम्यान, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. ह्युंदाई कंपनीनं बिनशर्त माफी मागावी अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. म्हणाल्या की, ह्युंदाई कंपनीने एक पत्र जारी केले आहे. मात्र, त्यात माफीनामा सुद्धा नाही. तुम्ही इथे बिझनेस करता आणि भारतीयांकडून नफा कमवता आणि भारताच्या विरोधातच बोलता. काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानसोबत उभं राहणार, हे आम्ही मान्य करणार नाही. कंपनीने संपूर्ण भारताची बिनशर्त माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी चतुर्वैदी यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हैदराबादला पावसाने धुतले

News Desk

वाढदिवस साजरा करू नका ,रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं आवाहन !

News Desk

गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

News Desk