HW News Marathi
देश / विदेश

दोन जजसमोर होणार ‘आप’च्या २० अपात्र आमदारांची पुढील सुनावणी

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना लाभाचे पद दिल्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या विरोधात आपच्या आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी इथून पुढे दोन ज जसमोर होणार असल्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने या आमदारांना अपात्र ठरविले असून आयोगाने २० आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय राष्ट्रपतीनीं देखील कायम ठेवला होता. या प्रकरणी ‘आप’ला न्यायालयाकडून थोडा दिलास मिळाला असून आयोगाने अपात्र ठरविलेल्या २० आमदारांच्या जागेवर फेरनिवडणुकीवर स्थगितीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आपच्या आमदारांना अपात्र ठरविण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वकील प्रशांत पटेल यांनी या प्रकरणाची सुनावणी दोन जजमध्ये होण्याची मागणी केली होती. तसेच आपच्या आमदारांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोन्हींच्या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे एक सदस्यीय पीठासमोर हे प्रकरण ठेवणे चूकीचे ठरेल. म्हणून या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन जजमध्ये होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नौदलाच्या पश्चिम विभागाचा नौदल अलंकरण समारंभ – 2022 मुंबईत संपन्न

News Desk

मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारात मोठी वाढ

News Desk

विमान अपहरणाच्या धमकीमुळे देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट

News Desk
महाराष्ट्र

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा – जयकुमार रावल

swarit

धुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलीआहे. ‘एखादा प्रकल्प जाहीर झाला की, शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. ज्या ठिकाणी प्रकल्प येतात त्या ठिकाणी जमीन खरेदी करुन वाढीम मोबदला घेण्याचा प्रकार रावल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ’ धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रावल यांच्यावर हे आरोप केले.

धुळ्याचे शेतकरी धर्म पाटील यांच्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, नवाब मलिकांविरोधात दोंडाईच्या कोर्टात अब्रू नुकसानीदा दावा ठोकला आहे. ‘माझ्या आजोबांनी ही विविध प्रकल्पासाठी जमीन दिल्या आहेत.’असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी म्हटले.

सरकारारी अधिकाऱ्यांना निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला असून पाटील यांना महेंद्र आणि नरेंद्र अशी दोन्ही मुले आहेत. पाटील यांच्या अंत्यसंस्कारा वेळी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते.

Related posts

“मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही?”, इम्तियाज जलीलांनी उठवला सवाल

News Desk

उद्यापासून ‘घट’ बसतील पण घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील? शालिनी ठाकरेंची टीका!

News Desk

#Coronavirus : ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनच्या निकषांमध्ये बदल – राजेश टोपे

News Desk