HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

नवी दिल्ली । हिरे व्यापारी नीरव मोदी पीएनबी बँकेला चुना लावून परदेशात फरार झाला होता. मोदी हा इंग्लंडमध्ये असल्याचे कळाल्यानंतर भारताकडून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू झाले होते. परंतु भारताच्या या प्रयत्नांवर ब्रिटिश सरकारने पाणी फेरले आहे. कारण ब्रिटीश अधिका-यांनी भारतीय तपास संस्थेकडे मोदींच्या घोटाळ्यातील पुरावे मागितले आहे. जर हे पुरावे नीरव मोदीला दिल्यास तो यांचा वापर करुन स्वत:च्या बाजुने लढण्यासाठी तयारी करू शकतो. यामुळे भारतीय संस्थांनी ब्रिटनकडे आक्षेप नोंदवला आहे.

यूके सीरियस फ्रॉड ऑफिस (एसएफओ)ने याबाबत भारताला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भारताकडे मोदींच्या पीएनबी घोटाळ्याबाबतची माहिती मागविली आहे. म्हणजे किती रुपयांचा घोटाळा, त्यांच्या संपत्तीवरील जप्तीची कारवाई, घोटाळ्यातील किती रक्कम इंग्लंडमध्ये वळती केली, या घोटीळ्यात कोणकोण सहभागी आहेत. याबाबत विचारणा केली होती. इंग्लंडमधील कायद्यामध्ये आरोपीला पुरावे आणि साक्षींची माहिती देण्याची तरतूद आहे. त्यामुळे हे कागदपत्र नीरव मोदीला दाखविण्यात येतील, असे या पत्रात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवज्योतसिंग सिद्धूंचा मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk

लोकसभेत तरी मोहन डेलकरांना न्याय मिळेल काय? – सामना

News Desk

फटाके फोडून न्यायालयाच्या आदेशाचे पुन्हा उल्लंघन

News Desk