HW News Marathi
देश / विदेश

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तानचा काश्मीर प्रश्न हा कायमच धगधगता राहिला आहे. त्यामुळे अनेक दशके लोटल्यानंतर आणि विविध प्रयत्नांनंतरही काश्मीर प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. मात्र आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काश्मीर प्रश्न शांततेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. “युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न सुटेल”, असा विश्वास इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. इम्रान खान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी काश्मीर प्रश्नाबाबत भाष्य केले.

”भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर आणि पाकिस्तान सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. युद्ध नव्हे तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न सोडवता येईल. जोपर्यंत चर्चा सुरु होणार नाही तोपर्यंत काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबतच्या कुठल्याही मार्गावर चर्चा करता येणार नाही,” असेही यावेळी इम्रान खान म्हणाले. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली असल्याचे सांगत त्यांनी त्या पर्यायांबाबत अधिक माहिती देण्यास मात्र इम्रान खान यांनी नकार दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपतींना निमंत्रण नाही

News Desk

या संकटसमयी अर्थमंत्री माझे नक्की ऐकतील…

swarit

पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये इंधन दरवाढीचा उडाला भडका

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १० दहशतवाद्यांना अटक

News Desk

श्रीनगर | काश्मीर पोलिसांनी सोमवारी(३ डिसेंबर) मोठी कारवाई करत दक्षिण काश्मिरातील दोन भागात लपलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या १० दहशतवाद्यांना अटक केले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि पंपोर भागातून या १० जणांना पकडण्यात आले.

काश्मीर खोर्‍यात विध्वंसक कारवाया करण्याचा मोठ्या घातपाताचा कट रचण्यात आला होता, तो या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर उघडकीस आला, असे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यात जिलेटिन कांड्या, डिटोनेटर, आयईडी बनविण्याचे साहित्य आणि ग्रेनेडचा समावेश आहे.

त्रालमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे युनिस नबी मलिक (पिंगलिश), फैयाज अहमद वानी (रेशीपोरा), रियाज अहमद गनई (नगीनपोरा) आणि बिलाल अहमद राथर (नगीनपोरा) अशी आहेत. पंपोरमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांमध्ये जावेद अहमद पर्रे (वबपोरा ख्रियू), यासिर बशीर वानी (वबपोरा), ताहिर युसूफ लोन (ख्रियू), रफिक अहमद बट (शारशाली), जावेद अहमद खांडे (ख्रियू) आणि इमरान अहमद नजार (ख्रियू) यांचा समावेश आहे.

Related posts

दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये दाखल!

News Desk

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी!

News Desk

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

News Desk