HW News Marathi
देश / विदेश

आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे नाव घेण्याचा अधिकार ! 

मुंबई । भारतीय वायू दलाने केलेल्या दमदार कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वायु दलाचे अभिनंदन केले आहे.”भारतीय वायुदलाने ज्या पद्धतीने ही कारवाई केली आहे, त्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे यांचे नाव घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे”, असे भागवत यावेळी म्हणाले. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले.

“भारतीय वायु दलाने देशातील जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या कारवाईदरम्यान त्यांनी कुठेही सामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची हानी होऊ दिली नाही. भारतीय वायुसेनेची ही कारवाई भारतीय सभ्यतेनुसारच झाली आहे”, असे सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले. दरम्यान, अवघ्या २० मिनिटांमध्ये भारतीय सैन्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. या हवाई हल्ल्याने जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. या कारवाईत जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर तसेच मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपची १५ राज्यांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांकडे मोठी जबाबदारी

Aprna

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

Aprna

आता बंगाल उपसागराजवळ चीनकडून बंदर उभारले जाणार

News Desk
देश / विदेश

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

News Desk

नवी दिल्ली | बोलता-बोलता अनेकदा अनेकांचा तोल जातो अशा नावांच्या यादीत पन्नालाल शाक्य यांचे नाव अग्रेसर आहे. पन्नालाल शाक्य यांनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका करताना बोले की, ‘काँग्रेसनं म्हटलं होतं की गरीबी हटवणार, पण त्यांनी तर गरिबांनाच हटवलं. तिथं अशा महिला आहेत. ज्या या नेत्यांना जन्म देतात… ज्या महिला संस्कारी मुलांना, समाजाच्या भल्याचा विचार न करणाऱ्या मुलांना जन्म देऊ शकत नाहीत त्यांनी वांझच राहावं’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

या वादग्रस्त विधानामुळे मध्यप्रदेश मधील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य हे पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेत आले.ते गुना इथून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. पण, महिलांविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

 

Related posts

सिंगापूरमध्ये आज ‘किम-ट्रम्प’ भेट

News Desk

खासदार महिला सुद्धा कास्टिंग काऊचपासून अपवाद राहिल्या नाही

Adil

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

swarit