HW News Marathi
देश / विदेश

जुलै महिन्यात दीड लाख शाखांची पोस्टल बँक होणार सुरू

नवी दिल्ली | जुलै महिन्यात टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही बॅंक जगातील सर्वांत मोठी बँक असणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून १५ दिवसांत टपाल खात्याला बँकिंगची परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी माहिती ही माहिती दिली आहे.

सिन्हा यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. ती मिळाल्यानंतर १५ दिवसांत एक डझनाहून अधिक पोस्टल बँक शाखा सुरू होतील. ही अशी बँक असेल की जिच्या १ लाख ३३ हजारांहून अधिक ब्रँच व एक्सेस पॉइंट ग्रामीण भागांत असतील. सध्या २३ हजार टपाल कार्यालयांत बँकिंगसाठी आवश्यक असणारी सीबीएस म्हणजेच कोअर बँकिंग सिस्टिम आहे.

सध्या पोस्टल बँकेच्या रायपूर व रांची या दोनच शहरांत शाखा असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी ६५० शाखा सुरू होतील. त्यानंतरच्या दीड वर्षात दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांत एक्सेस पॉइंट व एक्स्टेंशन शाखा सुरू झालेल्या असतील. शिवाय ९९५ एटीएमही बसवण्यात आले आहेत. देशातील १0 हजार गावांत प्रत्येक घराला मार्च २0१९पर्यंत विमा योजनेशी जोडण्याचे लक्ष्य टपाल खात्याने ठरवले आहे. आतापर्यंत १२४४ गावांत हे काम पूर्ण झाले आहे, असे मनोज सिन्हा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चोरी झाली म्हणून ‘ती’ आलिशान बंगलाच विकणार

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी आज गुजरातला जाणार

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, कोणाशीही युती करणार नाही!

News Desk
महाराष्ट्र

महानगर पालिकेच्या सदनिकेत कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन

News Desk

पुणे | कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी विस्थापित झालेले अशोक आठवले आणि सुरेश सकट यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन पुणे महानगर पालिकेच्या सदनिकेत करण्यात आले आहे. तसेच याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केल्यामुळे या कुटुंबाला मदत मिळाली आहे. तसेच ही दोन्ही विस्थापित कुटुंबे एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली होती.

दंगलग्रस्तांसमवेत त्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सध्या त्यांना कोणताही निवारा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमहापौर डॉ. धेंडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या सदनिकेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक ५ मधील दोन सदनिका या दोन कुटुंबियांना दिल्या आहेत. या सदनिका ११ महिन्यांकरिता आहेत. सदरची दोन्ही कुटुंबे दंगलग्रस्त असल्याने त्यांच्याकडून प्रति महिना एक रुपया इतके भाडे आकारले जाणार असून, वीजबिल सदनिका धारकांनी भरायचे आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

Related posts

पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून सर्व आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण

News Desk

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : पराभवानंतर पवार-शिंदेमध्ये बंद दाराआड चर्चा

News Desk