HW News Marathi
देश / विदेश

राफेल, राम मंदिर, कावेरीवरून संसदेत गदारोळ

नवी दिल्ली | संसदच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (१२ डिसेंबर) राफेल डील, राम मंदिर उभारणी आणि कावेरी पाणी प्रश्नांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या तिन्ही मुद्यांवरून काँग्रेस, शिवसेना, टीडीपी आणि एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत.

राफेल डीलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तर शिवसेनेने अयोध्येत राम मंदिर लवकरणात लवकर उभारावे, अशी मागणी केली.एआयएडीएमकेच्या सदस्यांनी कावेरी नदीतील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत कावेरी खोऱ्याती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. टीडीपीने विशाखापट्टणम येथे रेल्वे झोनची मागणी केली. या मुद्यांवरून विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा’

News Desk

अण्णा हजारे यांच्या सामाजिक कामांचा अनुभव हार्दिक पटेलच्या वयाच्या दुप्पट

News Desk

उत्तर कोरिया पुन्हा ‘धमाका’ करण्याच्या तयारी

News Desk
राजकारण

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

News Desk

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने राज्यपाला आनंदीबेन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ, नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा हे काँग्रेसचे शिष्टमंडळाने आज (१२ डिसेंबर) आनंदीबेन यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याची विनंतीही केली.

काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये बसपाच्या दोन, सपाच्या एका आणि ४ अपक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आमच्याकडे १२१ आमदारांचे पाठबळ आहे, असे काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. दरम्यान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेसने अद्यापही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने कमलनाथ आणि सिंधिया समर्थकांनी आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.

Related posts

रायगडमध्ये संशयास्पद बोटीचा दहशतवादी अँगल दिसून येत नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

भुजबळांच्या टोल्याला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Gauri Tilekar

भाजपच्या खासदारांना व्हीप जारी

News Desk