HW News Marathi
देश / विदेश

खासगी बसेस, टँकर, टेम्पो, स्कूल बस यांचा देशव्यापी संपात सहभाग

मुंबई | इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस ओनर्स असोसिएशन आणि इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशभरातील जवळपास १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने आणि राज्यातील १० लाख ट्रकमालक ही संपात सहभागी झाले आहेत. यात ट्रक, खासगी बसेस, टँकर, टेम्पो, स्कूल बस आणि व्हॅन बंद राहणार आहेत.

या संपात दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. या संपात स्कूल बस मालकांच्या संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. या संपाचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. या संपाची नोंद घेत, पालकांनी आपल्या मुलांना शाहेत सोडावे अशा सूचना शाळा आणि बस चालकांकडून पालकांना देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलयात १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती

News Desk

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान

Aprna

अर्थमंत्री सीतारामन यांची 47,541 कोटींचा कर हस्तांतरणाचा आगाऊ स्वरूपातील हप्ता राज्यांना वितरीत करण्यास मान्यता

News Desk
मुंबई

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk

मुंबई । कुर्ला पूर्व व पश्चिमेला जोडणा-या भुयारी मार्गाचे उदघाटन धुमधडाक्यात करण्यात आले. हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आता या भुयारी मार्गाची दुराव्यस्था झाली असून नागरिकांची गैरसोय झाली आहे. भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे पहायला मिळत आहे. पावसाळ्यात पाणी भरणे, अस्वच्छता तसेच बेवडे, गर्दुल्ले यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. भुयारी मार्ग जणू काय त्यांच्यासाठीच बांधलाय की काय? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

या भुयारी मार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरु होते. तसेच काही महिन्याआधी उदघाटन करण्यात आले. यावेळी नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या धुमधडाक्यात भुयारी मार्गाचे उदघाटन करण्यात आले. हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी आहे की गर्दुल्यांसाठी असा प्रश्न निर्माण होतो? सध्या मोठ्या प्रमाणात गर्द्दुल्यांचा वावर याठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग गर्द्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनला आहे.

दरम्यान,जनतेच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्गात सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. पण इथे सीसीटीव्ही आहेत पण सुरक्षा रक्षक नाही आणि सीसीटीव्ही सुरू आहेत की बंद हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सदर भुयारात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण ?

Related posts

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

swarit

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aprna