HW News Marathi
देश / विदेश

देशात महागाई स्थिर, सर्वत्र परिवर्तन सुरू | मोदी

देहरादून | ‘देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात परिवर्तन सुरू आहे’. तसेच पुढे बोलताना असे देखील म्हटले की, उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदार तयार आहेत. देशात महागाई स्थिर असून मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. एक दिवसाच्या देहरादून दौऱ्यावर असून त्यांनी उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटचे उद्घाटना वेळी बोलत होते.

यावेळी मोदींनी उपस्थित देशवासीयांना संबोधित करताना बोलत होते की, जेव्हा मी पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा मला गुजरातला दक्षिण कोरिया करायचा होता. कारण ‘ त्याचप्रमाणे गुजरात आणि दक्षिण कोरियाची लोकसंख्या समान आहे. या दोन्ही देशांना समुद्र किनारा लाभला आहे,’ असल्याचे मोदी सांगितले.

 

यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. ही समीट दोन दिवस सुरू राहणार आहे. उद्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या समीटचा समारोप होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे – सामना अग्रलेख

News Desk

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी!

News Desk

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये निवडणुकीपुर्वीच दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Gauri Tilekar

श्रीनगर | भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास २५० दहशतवादी तर काश्मीर खोऱ्यात ३०० दहशतवादी सक्रीय असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सोमवारपासून चार टप्प्यांत या स्थानिक निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकांच्या एक दिवस आधीच निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

पाकिस्तानच्या या कटाची माहिती मिळताच भारतीय जवानांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे लष्कर, पोलीस दल, सीआरपीएफ अशा सर्व सुरक्षा दलांना सुद्धा सावध राहण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले असून वाहने आणि संशयित व्यक्तींवर कडक नजर ठेवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडू नये यासाठीच पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली होत असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत मोर्चा काढायला हवा !

News Desk

अरुण जेटलींच्या कुटुंबियांचे मोदींनी केले सांत्वन

News Desk

#Lockdown 2 :  केंद्र सरकारची लॉकडाऊनची मार्गदर्शन नियमावली जारी

News Desk