HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने आज (१५ फेब्रुवारी) पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या हल्लाचा सर्व स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल मेहमूद या समन्स बजावून पुलावामा हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

तसेच भारताने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णयही घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आता भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. पुलावामा हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील अनेक भागात पाकिस्तान विरोधात निदर्शने सुरू आहे. आता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांची साडी उतरविण्या

News Desk

दिल्लीत शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचच्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक सुरु

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणात पदार्पण, लवकरच पक्ष स्थापन करणार!

News Desk