HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदी व जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था उत्तमरीत्या सुधारलेली असताना, भारतात या दोन धक्क्यांमुळे (नोटबंदी,जीएसटी) आर्थिक विकासाचा वेग कमी झाला’, अशी टीका रघुराम राजन यांनी केली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठातील व्याख्यानात ते बोलत होते.

देशात दरमहा १० लाख नोकऱ्यांची निर्मिती होणे ही गरज असल्याचेही राजन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता बँकांचे शुद्धिकरण, अपुऱ्या पायाभूत सुविधा, ऊर्जा प्रकल्पांची कमतरता या तीन प्रमुख समस्या असल्याचे यावेळी राजन म्हणाले. त्याचबरोबर ‘आता आहे त्याहून अधिक विकास दर गाठण्याची भारताची क्षमता आहे’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेचा पुढाकार

Gauri Tilekar

हार्दिक पटेलने घेतली प्रवीण तोगडियांची भेट

swarit

आसाराम बापूचा आज निकाल, जोधपूरलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk
राजकारण

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | ‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही स्थापन करणे हा या रथयात्रेमागचा मुख्य हेतु आहे. त्यामुळे जे लोक ही रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाखाली चिरडू’ असे धक्कादायक वक्तव्य भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी या व्यक्तव्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच ५, ७ आणि ९ डिसेंबर रोजी राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघात रथयात्रा काढण्याचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतला आहे. रथयात्रेनंतर कोलकाता येथे भाजपची एक सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह मार्गदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

News Desk

प्रियांका गांधी दिल्लीत जीन्स-टॉप, तर राजकीय दौऱ्यावर साडी नेसतात

News Desk

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

swarit