HW News Marathi
देश / विदेश

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

मुंबई | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आज (रविवारी) सलग चौथ्या दिवशी कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोल २५ पैशांनी, तर डिझेल १८ पैशांनी एवढे स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८७.२१ रुपये, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७८.८२ रुपये एवढी झाली आहे.

तर राजधानी दिल्लीतही पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल १७ पैसे स्वस्त झाले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर पेट्रोल ८१.७४ रुपये तर डिझेल प्रतिलिटर किंमत ७५.१९ एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी भारतीय चलनाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती.

मात्र देशात गेल्या अनेक दिवसांत दर दिवशी होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला होता. देशातील अनेक राज्यांत पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी ओलांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनकपातीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत आल्यावर कंगनाला होम क्वारंटाईन व्हावे लागेल ! | महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

#AyodhyaCase : युक्तीवाद पूर्ण, १७ नोव्हेंबरला येणार अंतिम निर्णय

News Desk

आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘बुस्टर डोस’

News Desk
देश / विदेश

#Amritsar : मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये सांत्वनपर मदत द्या !

Gauri Tilekar

मुंबई । “अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित देण्यात यावेत”,अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रावण दहनाचा कार्यक्रम बघत असणाऱ्या लोकांच्या गर्दीवर ट्रेन आली रेल्वेखाली ६१ हुन अधिक लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसरमध्ये घडली आहे. ‘मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ‘रामदास आठवले यांनी कळविले आहे.

काय आहे ही घटना

अमृतसर येथे (१९ ऑक्टोबर) रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रावणदहन होत असताना पेटलेला पुतळा एका बाजूला झुकल्यामुळे तो उपस्थितांच्या अंगावर पडेल अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान, या अपघातातून वाचण्यासाठी उपस्थित लोकांनी घटनास्थळावरून आजूबाजूच्या परिसरात धाव घेतली. रावणदहन होत असलेल्या जागेच्या बाजूला रेल्वेचे रूळ असल्यामुळे घाईने धावत असलेले लोक रेल्वेच्या रुळांवर आले. भरधाव वेगाने येत असलेल्या रेल्वेने अचानक रुळावर असलेल्या लोकांच्या जमावाला धडक दिली. सदर घटनेत ६१ हुन अधिक मृत्यमुखी पडले आहेत आणि ७२ जखमी आहेत.

Related posts

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk

Union Budget 2021 | नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडून अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद

News Desk

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk