HW News Marathi
देश / विदेश

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

कोलकत्ता | मोमो चॅलेंज या खेळाची दहशत सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात पसरत चालली आहे. सोशल मीडियावरील ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळानंतर आता मोमो चॅलेंजमुळे देशात बळी जात आहेत. या खेळामुळे भारतात दुसरा बळी गेला असून या जीवघेण्या खेळाचा सामना करणे कठीण झाले आहे. या घटनांनंतर आता प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

मोमो चॅलेंजसारख्या खेळात विशेषतः तरुणाई आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरुणाईने या खेळामुळे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थानमधील ब्यावर येथे ३१ जुलै रोजी या चॅलेंजचा भारतातील पहिला बळी गेला होता. एका दहावीतल्या विद्यार्थिनीने मोमो चॅलेंजमुळे आत्महत्या केली होती. तिच्या शरीरावरील जखमांवरून ही आत्महत्या मोमो चॅलेंजमुळे केल्याचे उघड झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वह्या, पुस्तकांना प्लास्टिक कव्हर नकोत | दिल्ली सरकार

News Desk

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

Gauri Tilekar

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? योगी आदित्यनाथ म्हणाले…..

News Desk