HW News Marathi
देश / विदेश

गुरुग्राम : गोळीबार करणारा सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली | देशाची राजधानी असलेल्या दिल्लीजवळील गुरुग्राम येथे न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या दोघांनाही गुरुग्राम मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान न्यायाधीश पत्नी असलेल्या रितु यांची प्राण ज्योत मालवली तर मुलगा ध्रुव अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी गोळी मारणारा आरोपी सुरक्षा रक्षक महिपाल याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी सुरक्षारक्षक न्यायाधीश श्रीकांत यांच्या सुरक्षेसाठी गेल्या दिड वर्षांपासून कार्यरत होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महिपालने गोळीबार करण्यापुर्वी न्यायाधीशांच्या धाकट्या मुलाबद्दल विचारले होते. पण त्या वेळी श्रीकांत यांचा धाकटा मुलगा घरी नव्हता. आरोपीने श्रीकांत यांचा मुलगा ध्रुव याला तीन तर पत्नी रितू यांना एक गोळी मारली होती. या प्रकरणाच्या पुढील तपासाकरिता पोलिसांनी एसआयटी तयार केली आहे. या टीममध्ये डिसीपी सुलोचना गजराल यांच्या नेतृत्वात २ एसीपी आणि ४ निरीक्षक यांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निपाह व्हायरसची दहशत, दिल्‍ली, गोवा, राज्यस्‍थानमध्ये सतर्कतेचा इशार

News Desk

“लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का”? नाना पटोले

News Desk

महाविकासआघाडीतील नाराज काँग्रेस नेते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार

News Desk
राजकारण

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk

नवी दिल्ली | सोशल मिडीयावर सध्या सुरु असलेल्या #METOO या सोशल चळवळीच्या घे-यात अडकलेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री एमजे अकबर परदेश दौ-यावरु परत आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सरारशी संबंधित असलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी इमेल द्वारे राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. राजीनामा पाठविण्याबरोबरच अकबर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीची वेळ देखील मागितली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप एमजे अकबर यांच्यावर केला आहे. आरोप झाल्यापासून अकबर वादाच्या भौव-यात अडकले होते. अकबर यांच्या वागण्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर वारंवार आरोप होत होते. त्याच बरोबर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भात अकबर यांनी प्रश्न विचारताच आपण यावर नंतर बोलू असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. अधिकृत परदेश दौ-यावर गेलेल्या केंद्रीय राज्य मंत्र्याने मात्र अद्याप कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेले नाही.

 

Related posts

उद्धव ठाकरेंच्या विमानासमोर नीलगाय, थोडक्यात टळला अनर्थ

News Desk

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विधानसभेचे तरुण अध्यक्षपदी

Aprna

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk