HW News Marathi
देश / विदेश

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले आर. के धवन यांचे सोमवारी दिल्लीच्या एका रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी ते ८१ वर्षांचे होते. सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या बी. एल. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वाढत्या वयानुसार आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्यांना गुरुवारी दिल्लीच्या बी. एल. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी धवन यांच्या निधनानंतर ट्विटर द्वारे श्रद्धांजली वाहिली. तसेच काही आठवणी देखील शेअर केल्या आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांचे खाजगी सचिव म्हणून देखील आर. के. धवन यांनी काम पाहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत- सामना

News Desk

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk

खासगी बसेस, टँकर, टेम्पो, स्कूल बस यांचा देशव्यापी संपात सहभाग

News Desk
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

मुंबई | राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाची धग राज्यात अद्याप कायम आहे. आरक्षण मिळाल्या शिवाय आपण शांत बसणार नसल्याची भूमिका सध्या मराठा आंदोलकांनी घेतलेली पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.

या आरक्षणाबाबत सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात 14 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, ही सुनावणी लवकर घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली होती. त्यामुळे ही सुनावणी सात दिवस आधी घेतली जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. याशिवाय आंदोलना दरम्यान आठ तरुणांनी आत्महत्यादेखील केल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांकडून सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्याच विनंती वरुन आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Related posts

“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर रोख

News Desk

केंद्राचा राज्यांना लस देताना आखडता हात, राजेश टोपेंचा गंभीर आरोप

News Desk

Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच… ‘ पंतप्रधानांनी केलं अभिनंदन!

News Desk