HW News Marathi
देश / विदेश

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा

नवी दिल्ली | भाजप २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा भाजपध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा नारा दिला. तसेच सर्वांनासोबत घेऊन लढणार असून २०१४ पेक्षा अधिक बहुमताने भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास यावेळी शहांनी व्यक्त केला असल्याची माहिती मिळाली आहे.

या वर्षाच्या अखेरीस मध्यप्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थानसह पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा विश्वास जेष्ठनी व्यक्त केला आहे. भाजप सरकारने या चार वर्षाच्या काळात नोटबंदी आणि जीएसटी यासारखे महत्त्वपुर्ण निर्णय घेतले असून त्यांची अंमलबजावणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक परदेशी दौरे करून भारतात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी कायम तुमच्यासोबत !

News Desk

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

Manasi Devkar

अटकपूर्व जामीन हवा असेल तर, केरळ पूरग्रस्तांना मदत करा | न्यायालय

swarit