HW News Marathi
Covid-19

ही वेळ राष्ट्रीय आपत्तीची आहे. अशा वेळी राजकारण खेळणे टाळावे- सोनिया गांधी

मुंबई | संपूर्ण जगावर देशावर आलेले कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय संकट आहे. यातून बाहेर कसे पडायचे यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. अशातच, राजकारण देखील सुरू आहे. हेच राजकारण करण्याची ही वेळ नाही असे अनेक नेत्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक ट्विट केले आहे.

ही वेळ राष्ट्रीय आपत्तीची आहे. अशा वेळी राजकारण खेळणे टाळावे. हा ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ असा मुद्दा नव्हे. ‘मनरेगा’सारखी अतिशय प्रभावी योजना सरकारच्या हाती आहे, ती अडीनडीच्या काळात भारतीयांसाठी तुम्ही वापरली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा- २००५’ आणि त्यानुसार गेली सुमारे १५ वर्षे राबविली जाणारी रोजगार योजना- म्हणजेच ‘मनरेगा’ सुपरिचित आहे. व्यवस्थात्मक बदल घडवण्यासाठी मूलगामी आणि विवेकी पाऊल कसे उचलले जाऊ शकते, याचे ‘मनरेगा’ हे उत्तम उदाहरण ठरले आहे. हे पाऊल मूलगामी, कारण भूक आणि वंचनेपासून मुक्तीचे साधन गरीब व अतिगरिबांना दिले.

तसेच हे पाऊल विवेकी ठरते, कारण पैशाची नितांत गरज ज्यांना आहे त्यांच्या हाती तो थेट पोहोचवण्याची ही योजना आहे. ज्यांनी ही योजना टाकाऊ ठरवली होती, त्यांनाही आता अनिच्छेने का होईना, याच योजनेवर अवलंबून राहणारे धोरण ठेवावे लागते आहे. काँग्रेसप्रणीत सरकारने सुसूत्र केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीप्रमाणेच, ‘मनरेगा’ जेथे योग्यरीत्या अमलात आली तेथे गरिबांना उपाशी-अर्धपोटीपणापासून, वंचित होण्यापासून वाचवले. ‘कोविड-१९’ आपत्तीच्या काळातही ही योजना उपयुक्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एक नंबर काम करत आहेत – अस्लम शेख

News Desk

सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होण्याची चिन्हे, आय़ुक्तांचं सूचक वक्तव्य

News Desk

राज्यात आज ८२४० नवे रुग्ण आढळेल, तर ५४६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk