HW News Marathi
देश / विदेश

‘पद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडा

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनी सिनेमा विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु, कोर्टाने पुन्हा एकदा निर्मात्यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सिनेमाला याआधी देखील कोर्टाने देशातील सर्व राज्यात रिलीज करण्याचे आदेश दिले असून ही पद्मावत सिनेमाला विरोध केला होता. ‘या सिनेमात राणी पद्मावतीचा अपमान करण्यात आला आहे म्हणून या सिनेमावर बंदी घाण्यात यावी अशी मागणी करणी सेना आणि राजपूत संघटनांनी कोर्टात केली होती.’ पण, ‘सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिले असून या सिनेमावर कोणी ही बंदी घालू शकत नाही.’ अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने या संघटनांची याचिका फेटाळली.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. यापूर्वी राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यात सिनेमावर बंदी आणली होती. त्यामुळे निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पद्मावत हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणार असून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींमुळे काश्मीरमध्ये तणाव

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

News Desk

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk
मुंबई

दलाल, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

 

 

मुंबई | सौरउर्जा प्रकल्पासाठी प्रशासनाने फळबागांसह संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने तसेच वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर विषारी औधष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या शेतकऱ्याला तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासन व जमीन संपादन करणाऱ्या काही दलालामुळे आपल्या हक्काच्या जमीनीची रक्कम मिळत नसल्याची कैफीयत या शेतकऱ्याच्या मुलाने मांडली.

Related posts

आता पुन्हा मुंबईत ‘ट्राम’ दर्शन

News Desk

चिकोत्रा धरणातील पाण्यासाठी खोदणार दिंडेवाडी डोंगरात चर

News Desk

आकाशवाणीचे वृत्त निवेदक संपावर

News Desk