HW News Marathi
देश / विदेश

Teachers Day | शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक भारती दिल्लीत

नवी दिल्ली | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करा, प्रत्येक कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून किमान वेतन २६०००/- रुपये देण्याचे धोरण लागू करा, सर्व शाळा-कॉलेजांना १०० टक्के अनुदान द्या या व इतर महत्वाच्या मागण्यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसोबत शिक्षक भारतीने पालिका बाजार संसद मार्ग ते जंतरमंतर मैदानापर्यंत जाणाऱ्या भव्य मोर्च्यात सहभाग घेतला.

शिक्षक भारती या शासन मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, सलीम शेख, कल्पना शेंडे, महिला अध्यक्षा संगिता पाटील यांच्यासह महाराष्ट्राभरातून शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी झाले होते.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, सेंट्रल ट्रेड युनियन, केंद्रीय कर्मचारी संघटना व देशपातळीवरील सर्व संघटनांनी या मोर्च्याच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरात केंद्र व राज्य सरकारविरुद्ध कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. या मोर्च्यात देशभरातून लाखो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तामिळनाडू – थर्मल प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी 

News Desk

#PulwamaAttack : आमच्या शूर जवानांवरील भ्याड हल्ल्याचा सरकार तीव्र निषेध करते !

News Desk

ठाकरे सरकार पाण्यात हे बसलेल्या म्हशीसारखे आहे ! विनायक मेटेंचा घणाघात

News Desk
राजकारण

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आठवले जाणार सर्वोच्च न्यायालयात

News Desk

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणे योग्य असून मीडियामध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालणे योग्य नाही. दलित शब्द उच्चारण्यास कुणावर बंदी आणणे तथा वृत्तपत्रांमध्ये, मिडियामध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नाही.याबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहीर केले. मीडियामध्ये दलित शब्द वापरण्यास बंदी आणणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

दलित शब्दाच्या सार्वजनिक वापरावर ; बोलण्यावर; मीडियातील बातम्यांमध्ये दलित शब्दावर बंदी आणणे योग्य ठरणार नाही. दलित हा शब्द फक्त अनुसूचित जातींसाठी वापरला जात नाही. दलित शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित शोषित पीडित समस्त वर्गासाठी तथा आदिवासींच्या अंतर्भावासह दलित शब्द वापरला जातो. जे लोक आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत पीडित आहेत शोषित आहेत ते कोणत्याही जाती धर्माचे असोत त्यांच्यासाठी आम्ही दलित शब्द वापरून भारतीय दलित पँथर हे संघटन महाराष्ट्रात स्थापन केले.

दलित पँथर या आक्रमक संघटनेने दलितांवरील अन्यायाचा प्रतिकार केला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्व शोषित मागासवर्गीयांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दलित या शब्दामुळेच मिळत होती. त्यामुळेच दलित पँथर हा संघटन आम्ही स्थापन केले . त्यामुळे दलित हा शब्द नकारात्मक नसून तो दलितांना लढण्याचीच प्रेरणा देणारा शब्द असल्यामुळे मीडियामध्ये तो शब्द वापरण्यावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही असे मत रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणे योग्य असून मीडियामध्ये मात्र दलित शब्द वापरण्यास नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णया योग्य नाही. या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे आठवलेंनी आज जाहीर केले.

Related posts

मात्र भाजपची साथ काही सोडताना दिसत नाही, ‘हयात’ कसा आलाय मर्दपणा?

News Desk

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk

व्यंगचित्राची कमाल, बुरा न मानो दिवाली है !

News Desk