HW News Marathi
देश / विदेश

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दिली देशव्यापी ‘बंद’ची हाक

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (१८ फेब्रुवारी) देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे.

हा बंदात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामीळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर आदी राज्यांमध्ये पाळला जाणार आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एका पत्रकाद्वारे दिली. या बंददरम्यान देशभरातील किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठा बंद राहतील, असे महासंघाने म्हटले आहे. महासंघातर्फे ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात येणार असून व्यापाऱ्यांकडून जवानांच्या कुटुबीयांसाठी आर्थिक मदत जमा करून ती थेट त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार असल्याचे महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू, २२ जखमी

News Desk

#Coronavirus : देशाचा आकडा ९३५२ वर, २४ तासांत ९०५ नवे कोरोना रुग्ण

News Desk

दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांनी मोदींना फटकारलं 

News Desk