HW News Marathi
देश / विदेश

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

मुंबई। ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’,असा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. सीबीआयमधील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांना सरकारने आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीबीआयचे दोन अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचा समावेश आहे. यांपैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीनं पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. याविरोधात भूषण सर्वोच्च न्यायलायत जाणार असे यांनी सांगितलं.राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. असा आरोप भूषण यांनी केला आहे.

काय आहे नेमकं CBI प्रकरण

राकेश अस्थाना यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून पदोन्नती देण्यास आलोक वर्मा यांनी विरोध केला आणि इथेच सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. सीबीआय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करताना अस्थाना यांनी आपल्या शिफारशी धुडकावल्याचं वर्मांना जाणवलं आणि तणाव वाढला. १५ ऑक्टोबरला सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदींनी ही घेतलीय. हा वाद शमवण्याचं काम ते आपल्या हुकमी एक्क्याकडे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Union Budget 2021 | नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडून अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद

News Desk

महाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद! – उद्धव ठाकरे

Aprna

Palghar lynching case : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चौकशीसंदर्भात बजावली नोटीस

News Desk
देश / विदेश

रात्री १० नंतरही मी फटाके फोडणार !

Gauri Tilekar

उज्जैन | सुप्रीम कोर्टाने दोन दिवसापूर्वी दिवाळीत फटाके फोडण्यासंबंधीत आणि फटाके विक्रीसाठी महत्वाचा निर्णय दिला होता. या आदेशानुसार ८ ते १० असे २ तास फटाके फोडू शकतो असा निर्णय दिला आहे, मात्र मध्यप्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. हिंदू सणांच्या परंपरेत कोणालाही ढवळाढवळ करू देणार अशी तीव्र प्रतीक्रिया मालवीय यांनी आपल्या ट्विटद्वारा केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार सण साजरा करण्याची वेळ नसते म्हणून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 10 नंतर मी फटाके फोडणार त्यासाठी मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल , मी आंनदाने गुरुंगात जायला तयार आहे’, असे ट्विट करत त्यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिले आहे.

दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आले असून , दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळ देखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहे.

Related posts

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली

News Desk