HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार नसल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने घेतला आहे. कारण या दहशतवाद्यांच्या मोठ मोठ्या अंत्ययात्रा काढल्या जातात. आणि काश्मिरी तरुणांच्या मनात भारता बद्दल द्वेषाचे बीज पेरले जाते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेला आहे.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र या दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. काश्मीरमधील तरुणांना भारताविरोद्धात भडकविणे आणि त्यांना देशविरोधी कारवायात सामील करुन दहशदवादी बनविणे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ‘ऑल-आउट’ अंतर्गत दहशदवाद्यांना मारले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला नवीन दहशतवाद्यांची फळी तयार होत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवादी संघटनाना मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मोदी आहेत आंबेडकरवादी…मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत मोदी?” आठवलेंची नवी कविता

News Desk

आरजे मलिष्कावर भारतीय भडकले! नेमकं काय झालं?

News Desk

विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk
मुंबई

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk

मुंबई |आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदीनंतर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार या बाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र महापालिकेने या बाबतचे नियम जाहिर केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी कडक कारवाईला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे बाप्पाच्या मुर्तीच्या सजावटीसाठी लागणा-या थर्माकोलच्या वस्तूंवर मात्र तुर्तास बंदी घालण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात तरुण मोठ्या प्रमाणावर बाप्पाच्या सजावटीसाठी लागणा-या मखरांची निर्मिती करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दृष्टीने थर्माकोलवरची बंदी तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.

प्लास्टिक बंदी संदर्भात शुक्रवारी मुंबईत मंत्रालयामध्ये झालेल्या मिटिंगमध्ये थर्माकोल पासून मखर गणपती सजावट बनविणा-या व्यापा-यांना आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्री रामदास कदम व प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ प्रदेश कार्य अध्यक्ष सचिन जामगे यांच्या प्रयत्नांने थर्माकोल असोशिएशनला यंदाच्या मानाच्या गणेश उत्सवामध्ये थर्माकोलवरची तात्पुरती बंदी उठविल्याने दिलासा मिळाला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे करोडो रूपयांचा खर्च वाया जाणार होता तसेच हजारो मराठी तरूण रोजगाराला मुकणार होते. थर्माकोलवरची बंदी उठवून तुर्तास निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. थर्माकॉलचे मखर तयार करणा-या अनेक तरुणांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारचे तसेच महापालिकेचे आभार मानले आहेत.

 

Related posts

शनिवारी रात्री पासून मेगा ब्लॉक

News Desk

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

दादरमध्ये शिकता येणार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदचे कोर्सेस

News Desk