HW News Marathi
देश / विदेश

EVMHacking : हॅकर सैयद शुजाने केला टीमच्या ११ जणांच्या हत्येचा दावा

नवी दिल्ली | ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने भारतातील राजकारण ढवळून निघाले असतानाच हॅकर सैयद शुजाने आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शुजा यांनी म्हटले की, हैदराबादमध्ये १३ मे २०१४ रोजी भाजप नेत्याला भेटायाला गेलेल्या त्याच्या टीम मधील ११ जणांची हत्या करण्यात आली. ही टीम भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठी गेली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शुजाने सांगितले की एक भारतीय पत्रकार त्याला भेटायला अमेरिकेत आला होता. त्या पत्रकाराने शुजाला सांगितले की या प्रकरणाला वाचा फोडली जाईल. परंतू त्या पत्रकाराने तसे काही केले नाही. एवढेच नाही तर, पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या ईव्हीएम हॅकिंगशी जोडली आहे. लंकेश या ही बातमी उघड करणार होत्या. मात्र, त्याआधीच त्यांना मारण्यात आले.

शुजाने दावा केला आहे, त्याची टीम २०१४ मध्ये हैदराबादच्या एका भाजप नेत्याला भेटली होती. त्यांनी या नेत्याला ब्लॅकमेल केले. ते केवळ मजेसाठी केले होते. मात्र, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यामध्ये आपले ११ सहकारी मारले गेले. मी जखमी झालो होते. ही घटना हैदराबादच्या उपनगरातील आहे. पुढील दिवशीच किशनबाग दंग्यामध्ये तीन जण मारले गेले होते. यामुळे मलाही मारण्यात येईल या भीतीने अमेरिका गाठल्याचे, शुजाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसच्या २ आमदारांची पक्षाला सोडचिट्ठी

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान जखमी

Gauri Tilekar

#NirbhayaCase : अखेर चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, उद्या फासावर चढवणार

swarit