HW News Marathi
देश / विदेश

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून नाही तर परदेशातून देखील मदत करण्यात येत आहे. केरळच्या मततीसाठी संयुक्त अरब अमिरातकडून (यूएई) यांनी मदतीचा हात दिला आहे. यूएईकडून जवळपास ७०० कोटींची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली आहे. केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या ३० ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

केंद्र सरकार आणि इतर राज्यांची मदत

केंद्र सरकारने केरळ नैसर्गिक आपत्तीसाठी ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर विविध राज्यांनी देखील मदतनिधी दिली आहे. महाराष्ट्राने २० कोटी रुपये दिले. तर दिल्ली सरकारने १० कोटी, तेलंगणा २५ कोटी, आंध प्रदेश १० कोटी आणि पंजाब १० कोटीची रक्कम देण्यात येणार आहे.

आमदार-खासदार एक महिन्याचा पगार देणार

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार-खासदारांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपला आणखी एक धक्का, NDAमधून ‘या’ पक्षाचाही काढता पाय

News Desk

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

अयोध्येत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अतिथी राहणार अनुपस्थितीत

News Desk
मुंबई

सिद्धूविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

swarit

मुंबई | भारतीय माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची घेतलेली गळाभेट त्यांच्यावरील टीकेचे मोठे कारण ठरली. अनेकांकडून याला कडाडून विरोध झाला आणि मोठ्या प्रमाणात टीका झाली. भाजपच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आझाद मैदानात सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला.

या मोर्चादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम म्हणाले, “आम्ही जागोजागी धरणं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही हे सुरु ठेवणार आहोत. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.” “सिद्धूनं जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू,” असंही ते म्हणाले आहेत. मोर्चा संपल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांचे पोस्टर्स जाळण्याचा प्रयत्न केला तसेच सिद्धू मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले.

Related posts

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

News Desk

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा

News Desk