HW News Marathi
महाराष्ट्र

केरळ पूरग्रस्तांना काँग्रेस-शिवसेनेकडून मदतीचा हात

मुंबई | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर्वपरिस्थितीत केरळ राज्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार-खासदारांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटींची मदत जाहीर केली . तसेच मुंबई पुण्यातून ८१ डॉक्टरांची टीमदेखील आज सकाळी केरळला रवाना झाली आहे. केरळमधील या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ३८५ जणांना मृत्यू तर हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही सुरु करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्थादेखील केरळ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार

News Desk

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

News Desk

“सुखी माणसाचा सदरा या कार्यक्रमातून आनंद सापडू दे”, राज ठाकरेंच्या केदार शिंदे आणि भरत जाधवांना शुभेच्छा!

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

पुरात एकाच कुटंबातील १८ जणांचा बळी

News Desk

जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

News Desk

भारत- चीनमध्ये युद्धाची शक्यता नाहीच!

News Desk