HW News Marathi
महाराष्ट्र

केरळ पूरग्रस्तांना काँग्रेस-शिवसेनेकडून मदतीचा हात

मुंबई | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर्वपरिस्थितीत केरळ राज्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार-खासदारांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटींची मदत जाहीर केली . तसेच मुंबई पुण्यातून ८१ डॉक्टरांची टीमदेखील आज सकाळी केरळला रवाना झाली आहे. केरळमधील या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ३८५ जणांना मृत्यू तर हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही सुरु करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्थादेखील केरळ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील,जाऊ द्या ना ताई!” शेलारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

News Desk

सरकार सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण

News Desk

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna