HW News Marathi
देश / विदेश

मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावी !

मुंबई | समाजवादी पार्टीचे मुंबई/महाराष्ट्र अध्यक्ष अबू आसिम आजमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबर, २०१८ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अबू आजमी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे कि निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाला जनतेकडून समर्थन भेटत असून नवीन मतदार उत्साहाने मतदार यादीमध्ये नाव नोंदवीत आहेत.

या अभियानाला राजकीय पक्षासह अनेक सेवा भावी संस्थाचे हि सहकार्य मिळत आहे. आजमी ने निवडणूक आयोगाच्या अभियानाची प्रशंसा करत म्हणाले आहे कि अभियानामुळे कोणताही मतदार मतदानापासून नाही राहू शकत. परंतु अभियानासाठी ३१ ऑक्टोंबर, २०१८ पर्यंत ची वेळ देण्यात आली असून मात्र अभियान संपण्यासाठी ७ दिवस बाकी आहे पण अद्यापही काही मतदार नोंदणी करू शकले नाहीत. यासाठी अबू आजमी यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली आहे. कि मतदार नोंदणीची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मतदान यादीमध्ये नाव नोंद करता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

News Desk

धनंजय मुडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हात उंचावून मानले सर्वांचे आभार !

Arati More

पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत

swarit
मुंबई

१०० दिवस उलटले तरी मृतदेह जेजे रुग्णालयात

News Desk

मुंबई | धारावी येथे २१ जुलैला सचिन जैसवाल वय १७ वर्ष मुलाचा मृत्य झाला होता. त्याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतून झाला आहे, असा आरोप मृत मुलाच्या घरच्यांनी केला आहे. आज १०० दिवसापेक्षा अधिक दिवस होऊन गेले त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात पडून आहे.परंतु त्याचा घरच्यांनी अजुनही मृतदेह हाती घेतला नाही.कारण मुलाचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतुन झाला आहे व जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही असे मृत सचिन जैस्वाल याचा घरच्यांनी सांगितले.

१२ जुलै रोजी मोबाईल चोरी प्रकरणी सचिन जैस्वाल याला संशयावरून ताब्यांत घेतले होते २२ तास चौकशी नंतर त्याला पोलिसांनी सोडल होते. त्यानंतर १३ जुलै रोजी त्याला ताप व अंगदुखी झाली तेव्हा शेजारचा दवाखान्यात नेले होते. १५ जुलै रोजी रक्ताची उलटी आल्यामुळे सायन रुग्णालयात पुन्हा दाखल केले तिथे अतिदक्षता विभागात ५ दिवस सचिनला ठेवण्यात आले आणि मग तेथेच त्याचा मृत्यु झाला .

पोलिसांनी २२ तास केलेल्या चौकशीत सचिनला पोलसानी बेदम मारले असं स्वतः ता त्याने घरी येताच घरच्यांना सांगितले होते.त्यामुळेच त्याला अंगदुखी व ताप आला होता. तो या गुन्ह्यात नसताना देखील त्याला संवषयावरून नेऊन विचारांना करून मारधाड केली त्यामुळे तो घाबरून आजारी पडला व त्याचा मृत्यू झाला असा दावा घरचे करत आहेत. परंतु डॉक्टरानी दिलेल्या रिपोर्ट मध्ये त्याला लॅपटो स्पायरेसिस झाल्याचे आढळले आहे. त्यानेच तो आजारी पडून मृत्यु झाला आहे असे पोलीस व डॉक्टरांकडून स्पष्ट झाले आहे.

परंतु जैस्वाल कुटुंबांचे म्हणणे असे आहे की आमचा मुलगा इतके दिवस ठणठणीत होता. पोलिसांनी केलेल्या मारहानीमुळे त्याची तब्यत खालावली आणि मृत्यू झाला. पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करून हे खोटे रिपोर्ट बनवले आहेत. जर पोलिसांनी काही केलं नाही मग आम्ही त्यांचा विराधात इतक्या केलेल्या कॉम्प्लेइंट वरिष्ठ का ? नोंदवत नाहीत. या केस बद्दल पोलिसांची प्रतिक्रिया घ्यायला गेले असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Related posts

आदित्य ठाकरेंवर नेतेपदाची जबाबदारी

News Desk

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

News Desk

नगरसेवकांचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून प्रगतिपुस्तक जाहीर

News Desk