HW News Marathi
देश / विदेश

इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का ?

मुंबई | केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी 2.50 रुपयांच्या कपातीची घोषणा केली होती. केंद्रच्या या घोषणेनंतर जवळपास 11 राज्यांनी आणखी 2.50 कमी करुन 5 रुपयांची कपात जाहीर केली होती. तरी देखील मुंबई सोमवारी पेट्रोल 87.50 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. शनिवारपासून (6 ऑक्टोबर) आजपर्यंत (8 ऑक्टोबर) तीन दिवसात पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 87 पैशांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत सोमवारी (८ ऑक्टोबर) पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. तर डिझेल 31 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटरचे दर ८७.५० तर डिझेलचे प्रति लिटर दर ७७.३७ एवढे आहेत. पुन्हा सुरू झालेल्या दरवाढीने ही पाच आणि 4 रुपये 6 पैशांची कपात फार काळ टिकेल असे दिसत नाही. सरकारने केलेल्या कपातीनंतर पेट्रोल नव्वदीच्या खाली आले होते. मात्र सततच्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे हा इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या कर कपातीचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्षात घेता आलाच नाही. त्यामुळे सरकारने सर्व सामान्यांची फसवणूक केली असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मुंबईत पेट्रोलवरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र, डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Aprna

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती…!

News Desk

हॉर्न वाजवायच्या मुंबईकरांच्या हौशेला मुंबई पोलिस देणार ‘पनिशिंग सिग्नलची’ शिक्षा….काय आहे ही शिक्षा?

Arati More
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

News Desk

आपल्या पाल्याला कोरोना होण्याची भीती असेल तर शाळेत पाठवू नये – अदिती तटकरे

News Desk

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांची कारकीर्द

News Desk