HW News Marathi
देश / विदेश

इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का ?

मुंबई | केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरांत प्रत्येकी 2.50 रुपयांच्या कपातीची घोषणा केली होती. केंद्रच्या या घोषणेनंतर जवळपास 11 राज्यांनी आणखी 2.50 कमी करुन 5 रुपयांची कपात जाहीर केली होती. तरी देखील मुंबई सोमवारी पेट्रोल 87.50 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. शनिवारपासून (6 ऑक्टोबर) आजपर्यंत (8 ऑक्टोबर) तीन दिवसात पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 87 पैशांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत झपाट्याने वाढत आहे.

मुंबईत सोमवारी (८ ऑक्टोबर) पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. तर डिझेल 31 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटरचे दर ८७.५० तर डिझेलचे प्रति लिटर दर ७७.३७ एवढे आहेत. पुन्हा सुरू झालेल्या दरवाढीने ही पाच आणि 4 रुपये 6 पैशांची कपात फार काळ टिकेल असे दिसत नाही. सरकारने केलेल्या कपातीनंतर पेट्रोल नव्वदीच्या खाली आले होते. मात्र सततच्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे हा इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या कर कपातीचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्षात घेता आलाच नाही. त्यामुळे सरकारने सर्व सामान्यांची फसवणूक केली असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मुंबईत पेट्रोलवरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र, डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना ‘चिनी खुळखुळे’ भेट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अनोखे आंदोलन

News Desk

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

Gauri Tilekar