HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

नवी दिल्ली | लोकांनी संयमाने आनंद व्यक्त करावा, असे आवाहन आरएसएसचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केले आहे. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाते स्वागत केले असून या निर्णयाकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये, असे आवाहन भागवतांनी देशातील जनतेला केले आहे. भागवत यांनी आज (९ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती.

भागवत पुढे म्हणाले की, “हिंदू-मुस्लिम असे काही नसते, भारताचे नागरिक हे भारताचे नागिक आहेत,” असे म्हणत हिंदू-मुस्लिम वादावर त्यांनी पडदा टाकला आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच,” असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालायाने दिला आहे. न्यायालयात अयोध्या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एकमताने झाला असून या जागी ३ महिन्यात राम मंदिर उभारण्याचे आदेश न्यायालायने दिले आहे. तसेच राम मंदिरसाठी राम ट्रस्ट स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे. आणि न्यायालयाने रामलल्लाचे अस्तित्त्व मान्य केले आहे.

तसेच मुस्लिमांना अयोध्येत ५ एकरी पर्यायी जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने निकाल दिला आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन केला जातो साजरा

Aprna

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

News Desk

अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेचा पुढाकार

Gauri Tilekar