HW News Marathi
देश / विदेश

…तेव्हा ‘या’ भूमित छत्रपती शिवाजी महाराजच उभे ठाकतात!

मुंबई | “जेव्हा काशीत औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी या भूमीत छत्रपती शिवाजीच उभे ठाकतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांचा गौरव केला. मोदी यांच्या हस्ते आज (१३ डिसेंबर) काशी विश्वनाथ कॉरिडोअरचे लोकार्पण झाले. या बांधकामासाठी ४४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावेळी भाषण देताना मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

मोदी म्हणाले, “काशीही औरंगजेबाच्या अत्याचार आणि दहशतीची ही नगरी साक्षीदार असून औरंगजेबाने तलवारीच्या बळावर येथील पंरपरा आणि सभ्यात बदलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा औरंगजेब असतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही निर्माण होतात. एखादा सालार मसूद येतो, तेव्हा राजा सुहेलदेव सारखे वीर योद्धेंचे भारताच्या एकतेचे आपल्या दर्शन घडवितात.”

“जेव्हा आपण काशीत प्रवेश करतो, तेव्हा सर्व बंधनातून मुक्त होतो, अशा पुरातण माण्यता आहेत. काशीमध्ये एक लौकिक ऊर्जा असून येथे आल्यावर केवळ आपल्या बाबांचे दर्शन होत नाही तर इतिहासाची देखील प्रचिती होते. काशीला एक गौरवशाली असा इतिहास आहे,” असे मोदी म्हणाले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हस्ते युपीमध्ये होणार १५०० कोटींच्या विकास योजनांचे उदघाटन!

News Desk

अशिक्षित लोक देशावरील ओझं! – अमित शाह

News Desk