HW News Marathi
देश / विदेश

रेल्वे करणार २ लाख कामगार भरती

नवी दिल्ली : रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ मनुष्यबळाअभावी होत असल्याचे समोर आल्याने रेल्वेने जम्बो कामगार भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची गस्ती यंत्रणा आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी येत्या काही वर्षात रेल्वेत दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा विभागात सध्या १६ टक्के जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठीच भरती करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात उत्कल एक्सप्रेस नुकतीच रूळावरून घसरली होती. त्यानंतर रेल्वेच्या मेंटेनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील त्रुटी दूर करण्यासाठी रेल्वेत १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षाची रेल्वे अपघाताची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी ११५ रेल्वे अपघात होतात. त्यामुळे आगामी काळात दुरूस्ती आणि सुरक्षा विभागात जास्तीत जास्त कामगार भरती करण्यात येणार असल्याचही या अधिकाऱ्याने सांगितलं. रेल्वे अपघात रोखण्यासाठी गँगमन आणि रेल्वेरूळाची पाहणी करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. रेल्वे रूळाची पाहणी करण्यासाठी १०० हून अधिक तपासणी वाहने खरेदी करण्याचा विचार आहे. शिवाय रेल्वे रूळाला तडे गेल्यास त्याची तात्काळ माहिती देणारी सेंसर टेक्नॉलॉजीही सुरू करण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांना मोठा दिलासा…..

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार, अटकेतील पाच कार्यकर्ते नक्षली संघटनेचे सदस्य

News Desk

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk