HW News Marathi
देश / विदेश

मांस खाण्यासाठी केली मित्राची हत्या

मुंबई – बालगुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याबद्दल नेहमीच चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये एक माणुसकीलाच काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षांच्या मुलाने नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याचे मांस खाऊन रक्तही पिण्याचा किळसवाणा प्रकार लुधियाना येथे घडला आहे.

दीपू कुमार असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे तर किशोर असे आरोपी मुलाचे नाव असून तो आठवीत शिकतो आहे. हे दोघे एकाच परिसरात राहात होते. दीपू कुमार सोमवापपासूनच घरातून बेपत्ता झाला होता. शोधाशोध करून त्याच्या कुटुंबीयांनी अखेर पोलिसांत तक्रार नोंदवली. नंतर शिर नसलेला दीपूचा मृतदेह शहरातील डुगरी परिसरात निर्जन ठिकाणी सापडला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दीपू आणि आरोपी मुलगा दिसले. त्यावरून पोलिसांनी आरोपी किशोरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंगाचे आमीष दाखवून दीपूला आरोपीने घरी नेले. त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर शस्त्राने त्याचे सहा तुकडे करून मासं खाल्ले आणि रक्तही प्यायलो, असे किशोरने सांगितले.

आरोपी मनोरुग्ण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मांस खाण्यासाठी आसुसलेल्या या मुलाने अनेकदा स्वतःचेही चावे घेतले होते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk

पत्नीने पतीच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपली

News Desk
महाराष्ट्र

दारू विक्री आणि बँकेच्या ट्रांजेक्शनवर आयकर विभागाचे लक्ष

News Desk

निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार….. आयुक्त

उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक जास्तीत – जास्त मतदान व्हावे यासाठी जन -जागृती करणार असून चांगले मतदान होईल अशी अपेक्षा असल्याचे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, हि निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार असल्याचं सुद्धा आयुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हटलं

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाय -योजना व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकारांना दिली . निंबाळकर म्हणाले कि २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त ४२ टक्के मतदान झाले होते . त्यापूर्वी देखील मतदानाचा आकडा फारसा चांगला नव्हता . ही बाब लक्षात घेऊन यंदा ७० ते ७४ टक्क्यांपर्यंत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत . यंदा १ लाख ५० हजार मतदार मतदान यादीतून वगळले असले तरी मतदानाची आकडेवाडी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे . तसेच हि निवडणूक निर्भय पणे पार पडण्यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि शहरात प्रवेश होणाऱ्या रस्त्यावर बारकाईने लक्ष दिले जाणार असल्याचं आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी म्हटलंय

https://youtu.be/JHbRS6CXSiI

राजेंद्र निंबाळकर आयुक्त

याशिवाय निवडणुकी दरम्यान बँकेत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात येणार असून यासाठी आयकर विभागाचे पाच विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निंबाळकर यांनी यावेळी दिली.

सोशल मीडियावर देखील आम्ही जातीने लक्ष देणार आहोत , सोशल मीडियावर निवडणुकीसंबंधी माहिती देतांना महानगरपालिका प्रशासन व निवडणूक आयोगाची संमती घेणे आवश्यक आहे . तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी माहिती दिली .

Related posts

दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी नितेश राणेंचे अमित शाहांना पत्र 

News Desk

कोटक महिंद्रचे सीईओ यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा!

News Desk