HW News Marathi
व्हिडीओ

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल! अर्थसंकल्पावर केलं ‘हे’ ट्विट…

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत २०२१-२२ चा केंद्रिय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सामान्यांची निराशा झाल्याचे चित्र समोर आले.दरम्यान, या अर्थसंकल्पाला काही जणांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दर्शवला..भाजपने केंद्राच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे..तर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच सडकून टीका केलेली पाहायला मिळाली आहे…या सगळ्यात अनेक विषयांवर आपले मत मांडणाऱ्या आणि बऱ्याच वेळा सोशल मिडीयावर ट्रोल होणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. ‘भारताच्या मागच्या शंभर वर्षात असा अर्थसंकल्प कधीच झाला नाही’, असे म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.मात्र त्यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

#AmrutaFadnavis #Nirmalasitharaman #UnionBudget #DevendraFadnavis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?

Manasi Devkar

Jayant Patil VS Devendra Fadnavis | जयंत पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस, सभागृहात तुफान फटकेबाजी

Gauri Tilekar

अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकारची बदनामी होतेय? या ‘४’ प्रसंगातून सरकार काय बोध घेणार ?

News Desk