HW News Marathi
व्हिडीओ

“भाजपला निराशेने ग्रासलंय,म्हणूनच..!” मुनगंटीवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. दरम्यान, यावेळी मुनगंटीवार यांनी याबाबत केलेल्या काही सूचक विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीनंतर मुनगंटीवार म्हणाले कि “या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही. भाजप आणि शेवसेनेचं काय होतं पुढे बघू. हिंदुत्वाचा आणि जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षाला ऐकावा लागेलच”, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं आहे. त्यामुळे आता मुनगंटीवारांचं हे वक्तव्य म्हणजे राज्यातील आगामी राजकीय बदलांचं भाकीत तर नाही ना ? अशा चर्चा रंगत असतानाच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवर भाष्य करत भाजपला टोला लगावला आहे. “भाजपला निराशेने ग्रासले आहे”, अशी बोचरी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली आहे.

#JayantPatil #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #UddhavThackeray #ChandrakantPatil #BJP #NCP #BJP #Shivsena #Maharashtra #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मशाल’ आणि शिवसेनेचं जुनं नातं काय?, पुन्हा इतिहास घडवणार?

Manasi Devkar

“राणे कुटुंबाला सरकारचं अभय, म्हणून…”, धमकीच्या व्हिडिओवर Kishori Pednekar यांचा टोला

News Desk

“कुणाची हिंमत नाही…”, मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मुद्यावर Aditya Thackeray आक्रमक

News Desk