HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंवर बोलताना देवेंद्र फडणवीसांची भूमिका ‘सावध’ का? काय आहे कारण ?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.दुसरीकडे, भाजपच्या महिला मोर्चानंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. थेट निवडणूक आयोगालाही किरीट सोमया यांनी पत्र लिहिले आहे.आता एकीकडे भाजपचे अन्य नेते धनंजय मुंडेंविरोधात इतके आक्रमक झालेले असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेपेक्षा मावळ भूमिका घेतलेली दिसली आहे. भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाहीये. याच पार्श्वभूमीवर, फडणवीसांची भूमिका इतकी सावध का आहे ? हे आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

#DhananjayMunde #DevendraFadnavis #AjitPawar #MahaVikasAghadi #BJP #SharadPawar #NCP #Maharashtra #RenuSharma #KarunaSharma #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis पोहोचले बालेकिल्ल्यात; Nagpur मधून दिल्या जनतेला शुभेच्छा

News Desk

नवशक्ति : अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजविते ६० प्रकारची वाद्ये

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk