HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत पाणी तुंबणार नाही असं आम्ही कधी बोललोच नाही,पेडणेकरांचा अजब दावा

मुंबईत कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तसेच, मुंबईत सखल भागात पाणी साचलं आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, ४ तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. आज (९ जून) त्या माध्यमांशी बोलत होत्या. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाल्या की, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे.”

#uddhavthackeray #kishoripednekar #mumbai #rain #MumbaiRains

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Gadchiroli Naxal Attack | शहीद जवांनाच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्याची गैरहजेरी, वीरपत्नीची खंत “

News Desk

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ पुन्हा चर्चेत, काय सांगतो इतिहास?

Manasi Devkar

“आम्हाला दया-माया नाही, उद्या सत्तेवर आलो तर…”; Nilesh Rane यांचा ठाकरे सरकारला मोठा इशारा

News Desk