HW News Marathi
व्हिडीओ

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. राजकीय वर्तृळातील या मोठ्या भूकंपाला आज (२३ नोव्हेंबर) १ वर्ष झाले. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली होती.

त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यालाही आता १ वर्ष पुर्ण होण्यास आले आहे. भाजपला बहुमतासाठी ४० आमदारांची गरज होती. भाजपचे १०५, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे १५ आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती. मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे २३ नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना ८० तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

#AjitPawar #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray #BJP #NCP #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सत्ता आम्ही कमवायची असते, त्यासाठी साकडं नाही घालत BJP नेत्यांवर Pankaja यांचा रोख

News Desk

Gopichand Padalkar यांचा राज्य सरकारला धमकी वजा इशारा! थेट Mantralaya समोर…

News Desk

नवीन खासदारांच्या एंट्रीने राज्यसभेत नारायण राणे,कुमार केतकर आणि संजय राऊत या तिघांची जुगलबंदी पाहायला मिळणार का?

swarit