HW News Marathi
व्हिडीओ

“घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?”, दानवेंची बोचरी टोलेबाजी

परतीच्या पावसाने राज्यातील खासकरुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दानवे आज (१७ ऑक्टोबर) पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
#RaosahebDanve #UddhavThackeray #COVID19 #Maharashtra #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinod Tawde VS Arvind Kejariwal | तावडेंमुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा दिल्लीत झाला विनोद…

Arati More

Maharashtra Assembly 2019 Exit Polls | यंदा राज्यात कोणाची सत्ता ?

Gauri Tilekar

“50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ” : Uday Samant

Seema Adhe