HW News Marathi
व्हिडीओ

बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं ! राऊतांकडून निर्णयाचं स्वागत

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात लखनौ CBI विशेष न्यायालयाचा निकाल आज (३० सप्टेंबर) तब्बल २८ वर्षांनी आला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेल्या विद्ध्वंसप्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे. याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व ३२ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. “बाबरी विद्ध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती”, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं”, असं म्हणत संजय राऊतांकडून निर्णयाचं स्वागतही करण्यात आले आहे.

#BabriVerdict #BabriMasjid #BabriMasjidDemolition #SanjayRaut #ModiGovernment #BJP #Shivsena #LalKrishnaAdvani #MurliManoharJoshi #Ayodhya #RamMandir #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वळसे-पाटलांना आता आम्ही दाखवतो की…”; Girish Mahajan यांचं मोठं आव्हान

News Desk

आता योगींचं कौतुक करणारे राज ठाकरे ‘तेव्हा’ काय म्हणाले होते?, पहा जुना व्हिडिओ |

News Desk

Disha Salian, Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणी Aditya Thackeray यांचं नाव चर्चेत का येतं?

Manasi Devkar