HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना नेहमी निर्णयाआधीच घोषणेची घाई का ?

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे कालपासून मोठे चर्चेत आहेत. कारण तुम्हाला माहीतच असेल की वडेट्टीवरांनी राज्यात ५ टप्प्यांत अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचं थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातमी दाखवली. आम्हीही दाखवली. तुम्हालाही निश्चितच वाटलं असेल की दिलासा मिळाला. पण तेवढ्यातच वडेट्टीवारांच्या या घोषणेवर आता राज्य सरकारकडून स्पष्टीकरण आलं की “राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत” राज्यात काही निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्याचा निर्णय अद्याप सरकारच्या विचाराधीन आहे आणि तो निश्चित झाला की त्याबाबत विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येतील, असं राज्य सरकारने सांगितलं.

झालं ! म्हणजे महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी पुन्हा निर्णय जाहीर करण्याची घाई केली आणि तेही पद्धतीशीर पत्रकार परिषद वैगरे घेऊन. पुढे वडेट्टीवारांनी स्पष्टीकरणही दिलं तत्वतः मान्यता वैगरे पण तोवर संभ्रम तर निर्माण झालाच. आता ही काही पहिलीच वेळ नाहीय असं घडायची. महाविकासआघाडीत असं अनेकदा घडलंय. कोणकोणत्या निर्णयांच्या बाबतीत ? आणि ह्याचा अर्थ काय पाहूया

#UddhavThackeray #AjitPawar #VijayWadettiwar #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #COVID19 #CoronaOutbreak
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi | सुषमा स्वराज यांच्या निधनाने पंतप्रधानांना अश्रु अनावर …

Arati More

“ह्यांची लेकरं मंत्री अन् शेतकऱ्यांच्या लेकरांची माती”; Sadabhau Khot यांची बोचरी टीका

News Desk

मराठीत बोलण्यास नकार ! ‘त्या’ लेखिकेच्या आंदोलनानंतर ‘मनसे’ आक्रमक, नेमकं प्रकरण काय ?

News Desk