HW News Marathi
राजकारण

संध्याकाळी ५.३० वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटू न शकल्याने मंगळवारपासून (१२ नोव्हेंबर) राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात सरकार बनविण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या या तिन्ही पक्षांमध्ये सामान वाटप कार्यक्रमासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. याचसाठी या पुढच्या काळात या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वप्रथम काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक होईल, आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष मिळून शिवसेनेशी चर्चा करतील अशी माहिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (१३ नोव्हेंबर) संध्याकाळी ५.३० वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज (१३ नोव्हेंबर) सकाळी वांद्र्याच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली.उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची एकत्र बैठक पार पडल्यानंतर पुन्हा काँग्रेसची स्वतंत्र बैठक झाली. “काँग्रेसशी योग्य दिशेने चर्चा सुरु आहे. लवकरच निर्णय घेऊ”, अशी माहिती या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिली. तर “उद्धव ठाकरेंशी झालेली आमची आजची भेट हि सदिच्छा भेट होती”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगणात आले आहे. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.३० वाजता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रावादीची याबाबत संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळे आता आमच्याकडे चर्चेसाठी बराच वेळ आहे”, असेही या पक्षांच्या नेत्यांकडून म्हणण्यात आले आहे. त्यामुळे निर्णय कधी होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ५-५ जणांची समिती गठीत

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रावादी या वैचारिक मतभिन्नता असलेल्या पक्षांना जर एकत्र यायचं असेल तर अनेक मुद्द्यावर चर्चा करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्याप्रमाणे, एकत्र सत्तास्थापन करण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून त्यांचा समान वाटप कार्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. याचसाठी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ५-५ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादी पक्षातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक या ५ जणांचा समावेश आहे. तर काँग्रेस पक्षातून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वप्रथम या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करतील त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MannKiBaat : विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ची अंतराळात झेप

News Desk

गणेश विसर्जनाची ही पद्धत कोणती?, नवनीत राणा झाल्या ट्रोल

Manasi Devkar

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

Aprna