HW News Marathi
राजकारण

खरंतर ‘हा’ चित्रपट ऑस्करला जायला हवा !

मुंबई | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेर यांनी आता या संपूर्ण वादावर भाष्य केले आहे. “खरंतर हा चित्रपट ऑस्करला जायला हवा. परंतु, आपल्याकडे या चित्रपटावरून वाद सुरु आहे”, असे अनुपम यांनी म्हटले आहे. ‘या चित्रपटात अनेक घटना या चुकीच्या पद्धतीने आणि अर्धवट मांडण्यात आल्या आहेत’, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेस चित्रपटांच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

“या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना अभिनय नैसर्गिक वाटावा यासाठी मी अनेक पुस्तके वाचली. माझ्या चित्रपटसृष्टीतील ३५ वर्षांच्या करियरमध्ये आणि ५१५ चित्रपटांमधील हा सर्वात कठीण चित्रपट आहे. खरंतर हा चित्र ऑस्करसाठी जायला हवा. परंतु, या चित्रपटावरून वाद सुरु झाला आहे. आजपासून २५ वर्षांनंतर जेव्हा चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या चित्रपटाचे नाव पहिले असेल”, असेही अनुपम खेर यांनी यावेळी म्हटले.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यानंतरच या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट सर्वप्रथम काँग्रेसच्या नेत्यांना दाखविण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. तसे झाले नाही तर काँग्रेस या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाईल, असा इशारा देखील काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

News Desk

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

‘हिट’ मारल्यानंतर किती डास मेले ते मोजत बसू की, आरामात झोपू ?

News Desk
महाराष्ट्र

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

नवी दिल्ली | कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांवरुन १० टक्के करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. शेतकऱ्यांना प्रति किलो कांद्यामागे अवघे १ ते २ रुपये इतकाच दर मिळत होता. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यामागे २०० रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

नाशिकच्या संजय साठे यांनी तब्बल ७५० किलो कांदा विकून कमविलेले एकूण १ हजार ६४ रुपये पंतप्रधान मोदींना पाठविले होते. त्यानंतर पीएमओकडून देखील याची दखल घेतली गेली.

Related posts

सिंहगडावर दूरदर्शन च्या आवारात असिस्टंट इंजिनियर लतीफ सय्यद नग्न अवस्थेत

Adil

राष्ट्रवादीत आणखी एका मोठ्या नेत्याची एन्ट्री!

News Desk

‘गृहखात्यावरून’ राजकारण; ‘त्या’ चर्चांना मुख्यमंत्र्यांनी दिला पूर्णविराम

Manasi Devkar